अण्णा हजारे यांनी तिहार तुरुंगातून देशवासियाना संदेश दिलेला आहे. त्यांनी दिलेला संदेश आम्ही येथे देत आहोत.
प्रिय देशबांधवानो,
स्वातंत्राची दुसरी लढाई सुरु झाली आहे. मी तुरुंगात असो अथवा बाहेर , जोपर्यंत मजबूत लोकपाल बिल संसदेत जात नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील. जोपर्यंत जे पी पार्क मध्ये विना शर्त उपोषणाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी तिहार तुरुंगातूनच उपोषण चालू ठेवेन. सर्व देशवासियांना माझी विनंती आहे कि त्यांनी आंदोलन चालूच ठेवावे.
सर्वांचा विरोध हा शांतीपूर्ण असावा. होऊ शकते कि काही लोक यामध्ये दंगा पसरवण्याचा प्रयत्न करतील , पण तरीही आपलं आंदोलन शान्तिपुर्नच असायला हवं. आज जर चुकलो तर पुन्हा हि संधी मिळणार नाही.
जय हिंद.

एस.आम्ही याचा पालन करू.